मी 'Autobiography of a yogi ' हे स्वामी परमहंस योगानंद यांचे अंजली गोखले यांनी अनुवादित केलेले पुस्तक वाचले.
श्री स्वामी परमहंस योगानंद , परमावतार बाबाजी व भारतीय गुरुपरंपरेला वंदन करून मी या ग्रंथाबद्दल लिहित आहे.
स्वामी परमहंस योगानंद हे ' स्वामी ' पदाला कसे पोहचले या वाटचालीतील अनुभव व आध्यात्मिक प्रगती तसेच त्यांचे कार्य याबद्दल वाचणे हा एक सात्विक अनुभव आहे.
यामध्ये आपल्याला " सिद्ध पुरुष " , व क्रियायोग यांची माहिती मिळते , आपले आध्यात्मिक ज्ञान किती उच्च पातळीचे आहे ते कळते. परदेशा मधे क्रियायोगाच्या प्रसाराचे महान कार्य करणाऱ्या ' स्वामींंचे ' अनुभव वाचणे व समजून घेणे ही आजच्या काळाची गरज आहे असे मला वाटते.
सदर चरित्रातील प्रत्येक विभागाचा थोडक्यात परिचय करून देण्याचा प्रयत्न करणार आहे.
बालपण -
सुरुवातीलाच स्वामींनी गुरुशिष्य संबंध व
'परमतत्वाचा शोध ' ही भारतीय संस्कृतीची वैशिष्ट्ये समजली जातात आणि त्यांच्या आयुष्यातील मार्ग त्यांना परमेश्वर स्वरूप ऋषीतुल्य गुरूंकडे घेऊन गेला असे सांगितले आहे.
आठवणी - स्वामींना ते मागील जन्मी ' योगी ' म्हणून हिमालयात राहत हे आठवत असे.
ते म्हणतात की माझ्या लहानपणच्या आठवणी विलक्षण अशा नाहीत.
श्री भगवतीचरण घोष यांचे ते चवथे अपत्य. नांव मुकुंदलाल. चार भाऊ व चार बहिणी असे कुटुंब होते. वडिल असाधारण गणितज्ञ व तर्कशास्त्री होते. आई या भावंडांना धर्मग्रंथातील गोष्टी सांगत असे व वळण लावीत असे. आईचा दानधर्माकडे कल होता .
वडिलांचे वागणे शिस्तबद्ध होते. त्यांनी रेल्वेत नोकरी करत असताना बोनस साठी अर्ज केला नाही. नंतर हिशेब तपासणी मधे हे लक्षात आल्यावर त्यांना १२५००० रू. देण्यात आले. तेव्हा ते म्हणाले ' एवढे काय पैशासारख्या बाह्य फायद्यानी फुशारून जायचे.' ते लाहिरी महाशयांचे शिष्य कसे झाले ही गोष्ट महत्त्वाची आहे. घरात लाहिरी महाशयांचे छायाचित्र होते. या छायाचित्रा समोर मुकुंदलाल ध्यान लावून बसत. या छायाचित्राने त्यांच्या जीवनावर प्रभावी परिणाम केला होता.
स्वामी आठ वर्षांचे असताना त्याना छायाचित्रातुन आशिर्वाद मिळाले. मुकुंदलालना कॉलरा झाला व त्यावर डॉक्टरी उपाय चालत नव्हते तेव्हा आईने त्यांना उशाशी टांगलेल्या लाहिरी महाशयांच्या छायाचित्राकडे नमस्कार करून पाहण्यास सांगितले , त्याप्रमाणे त्यांनी केले असता खोलीला व मुकुंदलाल याना दिपवून टाकणारा प्रकाश दिसला व रोगाची लक्षणे निघून गेली व ते बरे झाले. त्यानंतर ध्यानामध्ये हिमालयामधील योगींबरोबरच्या संवादातून परमेश्वराचा शोध घेण्याची त्यांची जिज्ञासा दृढ झाली.
श्री स्वामी परमहंस योगानंद , परमावतार बाबाजी व भारतीय गुरुपरंपरेला वंदन करून मी या ग्रंथाबद्दल लिहित आहे.
स्वामी परमहंस योगानंद हे ' स्वामी ' पदाला कसे पोहचले या वाटचालीतील अनुभव व आध्यात्मिक प्रगती तसेच त्यांचे कार्य याबद्दल वाचणे हा एक सात्विक अनुभव आहे.
यामध्ये आपल्याला " सिद्ध पुरुष " , व क्रियायोग यांची माहिती मिळते , आपले आध्यात्मिक ज्ञान किती उच्च पातळीचे आहे ते कळते. परदेशा मधे क्रियायोगाच्या प्रसाराचे महान कार्य करणाऱ्या ' स्वामींंचे ' अनुभव वाचणे व समजून घेणे ही आजच्या काळाची गरज आहे असे मला वाटते.
सदर चरित्रातील प्रत्येक विभागाचा थोडक्यात परिचय करून देण्याचा प्रयत्न करणार आहे.
बालपण -
सुरुवातीलाच स्वामींनी गुरुशिष्य संबंध व
'परमतत्वाचा शोध ' ही भारतीय संस्कृतीची वैशिष्ट्ये समजली जातात आणि त्यांच्या आयुष्यातील मार्ग त्यांना परमेश्वर स्वरूप ऋषीतुल्य गुरूंकडे घेऊन गेला असे सांगितले आहे.
आठवणी - स्वामींना ते मागील जन्मी ' योगी ' म्हणून हिमालयात राहत हे आठवत असे.
ते म्हणतात की माझ्या लहानपणच्या आठवणी विलक्षण अशा नाहीत.
श्री भगवतीचरण घोष यांचे ते चवथे अपत्य. नांव मुकुंदलाल. चार भाऊ व चार बहिणी असे कुटुंब होते. वडिल असाधारण गणितज्ञ व तर्कशास्त्री होते. आई या भावंडांना धर्मग्रंथातील गोष्टी सांगत असे व वळण लावीत असे. आईचा दानधर्माकडे कल होता .
वडिलांचे वागणे शिस्तबद्ध होते. त्यांनी रेल्वेत नोकरी करत असताना बोनस साठी अर्ज केला नाही. नंतर हिशेब तपासणी मधे हे लक्षात आल्यावर त्यांना १२५००० रू. देण्यात आले. तेव्हा ते म्हणाले ' एवढे काय पैशासारख्या बाह्य फायद्यानी फुशारून जायचे.' ते लाहिरी महाशयांचे शिष्य कसे झाले ही गोष्ट महत्त्वाची आहे. घरात लाहिरी महाशयांचे छायाचित्र होते. या छायाचित्रा समोर मुकुंदलाल ध्यान लावून बसत. या छायाचित्राने त्यांच्या जीवनावर प्रभावी परिणाम केला होता.
स्वामी आठ वर्षांचे असताना त्याना छायाचित्रातुन आशिर्वाद मिळाले. मुकुंदलालना कॉलरा झाला व त्यावर डॉक्टरी उपाय चालत नव्हते तेव्हा आईने त्यांना उशाशी टांगलेल्या लाहिरी महाशयांच्या छायाचित्राकडे नमस्कार करून पाहण्यास सांगितले , त्याप्रमाणे त्यांनी केले असता खोलीला व मुकुंदलाल याना दिपवून टाकणारा प्रकाश दिसला व रोगाची लक्षणे निघून गेली व ते बरे झाले. त्यानंतर ध्यानामध्ये हिमालयामधील योगींबरोबरच्या संवादातून परमेश्वराचा शोध घेण्याची त्यांची जिज्ञासा दृढ झाली.